नवी दिल्ली : देशावर करोनासारखं जीवघेणं संकट घोंघावत असताना सरकारनं पेट्रोल-डिझेलवर गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळवणारा नफा जनतेसाठी खर्च करायला हवा, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारनं जनतेला दिलासा देणं गरजेचं असल्याचंही सिंघवी यांनी म्हटलंय. __ गेल्या सहा वर्षांत सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे तब्बल २० लाख करोड रुपयांचा फायदा झाल्याचा दावाही अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. सरकारनं नफेखोरी न करता हा पैसा अशा कठिण प्रसंगी आपल्या फायद्यातील एक भाग जनतेसाठी वापरायला हवा, अशी मागणीही सिंघवी यांनी केलीय. देशात लांकडाऊन सुरू असताना एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी हा संवाद साधलाय. 'आज कच्च्या तेलाची किंमत २३ डॉलर प्रति बरलवर पोहचलीयगेल्या सहा वर्षांत किंमतीमध्ये झालेली घसरण आणि उत्पादन शुल्क मिळून हिशोब केला तर सरकारला जवळपास २० लाख करोड रुपयांचा नफा झालाय' असा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय.
अशी करवसुली तर इंग्रजांनीही केली नव्हती, काँग्रसची मोदी सरकारवर टीका